अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच विस्ताराला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र अधिवेशाचे सूप वाजले तरीही विस्तार झालेला नाही. अशाताच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच विस्ताराला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र अधिवेशाचे सूप वाजले तरीही विस्तार झालेला नाही. अशाताच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की,राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही.थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे.पाच सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. विस्ताराच्या दिवशी मी परदेशात असेन.