अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-सातत्याने नॉट रिचेबलचा ठपका बसलेल्या बीएसएनएलने आता कात टाकण्यास सुरुवात केली असून, ४- जी सेवा देण्यास कंबर कसली आहे. यात देशभरात तब्बल २४ हजार तर राज्यातील ग्रामीण भागात दोन हजार ४-जीचे बीटीएस टॉवर उभारण्यात येणार असून लवकरच दुर्गम भागात बीएसएनएलच्या मोबाईलची रिंग वाजणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे महाराष्ट्र-गोवा प्रांताचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेण्यासाठी शर्मा आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देशभरात बीएसएनएलने ४- जी सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशाने स्वतः तयार केलेली ४-जीची यंत्रणा विकसित केली असून, यात ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा निर्धार केला आहे. या सेवेअंतर्गत देशातील जिथे कोणतेच सिग्नल आणि ऑपरेटर नाहीत अशा ठिकाणी बीएसएनएलची टॉवर्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टॉवर्समुळे त्या गानांतील नागरिकांना बीएसएनएलद्वारे सेवा पुरवण्यात येणार आहे. यात राज्यात अतिदुर्गम भागातील गावांमध्ये २ हजार बीएसएनएल ४ जी बी.टी.एस टॉवर उभारण्याचे लक्ष्य ठेवले असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात-१६, जालना जिल्ह्यात-१९, आणि बुलढाणा जिल्ह्यातील ४४ दुर्गम भागातील गावांमध्ये टॉवर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!