Saturday, January 18, 2025
Homeब्रेकिंगटोमॅटो आणखी भाव खाणार टोमॅटोचे दर थेट ३०० पार जाण्याची शक्यता; जाणून...

टोमॅटो आणखी भाव खाणार टोमॅटोचे दर थेट ३०० पार जाण्याची शक्यता; जाणून घ्या का सतत वाढत आहे टोमॅटोचा भाव?

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने ते आपल्या जेवणातून दूर गेले आहेत. जूनपर्यंत जे टोमॅटो किलोने विकत घेतले जात होते, ते आता ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. मे महिन्यात १५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज २५० ते २८० रुपये किलोने विकला जात असल्याची परिस्थिती आहे. पण येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर आणखी वाढणार आहेत. टोमॅटोचा भाव ३०० रुपये किलोच्या पुढे जाणार आहे.

टोमॅटोचा भाव ३०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता
टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा भाव ३०० रुपये किलोच्या पुढे जाणार आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची भीती घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आवक कमी असल्याने टोमॅटोच्या घाऊक दरात वाढ होऊन त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होणार असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव वाढू शकतात.यासंदर्भात दिल्लीच्या आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि एपीएमसीचे सदस्य अशोक कौशिक म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात ६० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो २२० रुपये किलोवर पोहोचला आहे. हिमाचल प्रदेशसारख्या टोमॅटो उत्पादक राज्यात भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. तेथून दिल्लीपर्यंत भाजीपाला पोहोचण्यासाठी सहा-आठ तासांचा अवधी लागतो. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव किलोमागे ३०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

टोमॅटोचे भाव का कमी होत नाही?
टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची किंमत कमी होण्याऐवजी सतत वाढताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होताना दिसत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातील घाऊक मंडईत टोमॅटोचे भाव वाढत आहेत, तर तामिळनाडूमध्येही टोमॅटोचे भाव वाढत आहेत. टोमॅटोचे घाऊक भाव इथेही २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. चेन्नईतील कोयंबेडू घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी टोमॅटोच्या दरात होणारी वाढ दिवसेंदिवस टोमॅटोला उच्चांकावर पोहोचवत आहे.टोमॅटोच्या आणखी एका व्यापाऱ्याने सांगितले की, आझादपूर मंडईत हिमाचल प्रदेशातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो यायचे. आजकाल हिमाचलमधील रस्ता भूस्खलनामुळे बंद आहे. त्यामुळे टोमॅटो आणि इतर फळे आणि भाज्याही तिथून कमी येत आहेत. काही लोक लांबून आणत आहेत, पण भाजी आणायला नेहमीपेक्षा सहा-आठ तास जास्त लागत आहेत. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव किलोमागे ३०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

गुणवत्ता खराब होत आहे
हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जाही खालावल्याचे म्हटले जात आहे. सामान्य दिवशी टोमॅटो बरेच दिवस खराब होत नाहीत. मात्र यावेळी टोमॅटो एका दिवसानंतर क्रेटमध्येच सडू लागतात. म्हणूनच ते जास्त काळ ठेवता येत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp